२४ ऑगस्ट २०१८

निरोप


    निरोप
""'"""""""""""""""""""""""""'""_
पक्ष्यांना फुटतात पंख, जातात ती उडून,
का कसे कोण जाणे, मी जातो खचून.

तुमच्यासंग जगलो,खेळलो अन् बागडलोही.
पण तुमचे प्रेम मी , मी कधीच विसरलो नाही.

कटू शब्द बोललो , असेन मी कधी.
पण खरच प्रेमाचा ओलावा मनामधी.

जेव्हा कधी गुरफटेल मी, दु:खाच्या जाळ्यात.
तेव्हा येईल तुमचीच , आठवणं मनात.

आता असच नुसतं,कण्हत-कण्हत जगायचं.
जीवनातल्या आठवणी आता, स्वप्नातच पाहायचं.

आता द्यावा निरोप मजला हसून.
त्या हास्याने माझे जीवन जाईल फुलून.

©️कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: