निरोप
""'"""""""""""""""""""""""""'""_
पक्ष्यांना फुटतात पंख, जातात ती उडून,
का कसे कोण जाणे, मी जातो खचून.
""'"""""""""""""""""""""""""'""_
पक्ष्यांना फुटतात पंख, जातात ती उडून,
का कसे कोण जाणे, मी जातो खचून.
तुमच्यासंग जगलो,खेळलो अन् बागडलोही.
पण तुमचे प्रेम मी , मी कधीच विसरलो नाही.
पण तुमचे प्रेम मी , मी कधीच विसरलो नाही.
कटू शब्द बोललो , असेन मी कधी.
पण खरच प्रेमाचा ओलावा मनामधी.
पण खरच प्रेमाचा ओलावा मनामधी.
जेव्हा कधी गुरफटेल मी, दु:खाच्या जाळ्यात.
तेव्हा येईल तुमचीच , आठवणं मनात.
तेव्हा येईल तुमचीच , आठवणं मनात.
आता असच नुसतं,कण्हत-कण्हत जगायचं.
जीवनातल्या आठवणी आता, स्वप्नातच पाहायचं.
जीवनातल्या आठवणी आता, स्वप्नातच पाहायचं.
आता द्यावा निरोप मजला हसून.
त्या हास्याने माझे जीवन जाईल फुलून.
त्या हास्याने माझे जीवन जाईल फुलून.
©️कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा