आयुष्याचा प्रवास करतांना...
अनेकांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, कितीतरी प्रश्नाने मनात कल्लोळ माजलेला असतो. मनातल्या मनात गुंता वाढत जातो. नकारात्मकतेने मेंदू जड होत जातो. आपले असणारे ही परके भासू लागतात.. कारण त्यावेळी आपल्याला समजून घेणारं कोणीच नसतं... आणि समजून घेणारं कोणी नसणं ही भावना देखील किती दु:खदायी असते ना..!
आयुष्याची संध्याकाळ होते की काय अशी भीती मनात वाटू लागते. कितीतरी भावनांचा गोंधळ मनात दाटून येतात.
पण जीवनाच्या वाटेवर चालत असताना दुःख, वेदना, संवेदना, एकांत....वगैरे वगैरे... हे सारं काही गरजेचं असतं, गरजेचं आहे.. यामुळेच आपण स्वतः चा शोध घेऊ शकतो आणि आपली माणसं या अवतरणचिन्हामध्ये असणारी 'आपली खरी माणसं' ओळखून येतात...
मित्रा, आपल्याला हवं तेव्हा कोणीतरी साथ देईल किंवा सोबत असेलच याची खात्री नाही.. पण ज्या परिस्थीतीतून आपण जात आहोत.. त्या परिस्थतीसोबत आपण एकटे असतो.. आणि हा प्रवास एकट्याचा असतो. तो एकट्यानेच करायचा असतो. या एकटाच्या, एकांताच्या प्रवासात आपणच आपली साथ द्यायची असते.. आयुष्याची संध्याकाळ होत असली तरी ही संध्याकाळ उद्याच्या सूर्योदयाची संकेत देत असते... आपला आयुष्याचा सूर्योदय पहायचं असेल तर सकारात्मकतेने आत्महत्येची हत्या करायला शिकायला हवं...
मान्य आहे रे की, आयुष्याचा प्रवास सोपा नाही.. पण मित्रा अवघड देखील मुळीच नाही... काहीही झालं तरी थांबू नकोस.. चालता चालता पडला असशील तर उठ.. विचार कर.. पळ....धाव...धडपड कर... आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढ... थांबला असशील तर थोडं थांब आराम कर विचार पुन्हा चालायला सुरुवात कर.. पण या प्रवासाला पूर्णविराम न देता.. हा प्रवास नित्याने चालू ठेव... एक दिवस आपल्याला हवं असणारं स्टेशन नक्की येईल...
आणि शेवटचं एकच सांगतो की,
आपल्या आयुष्याचा प्रवास भविष्यकाळासह,
भूतकाळ सुंदर असावा असं वाटत असेल तर
आपला वर्तमानकाळ संघर्षानी भरलेला असायला हवं...
©️®️ दिनेश जवरीलाल राठोड
dineshjrathod1998@gmail.com
1 टिप्पणी:
Perfect going 👌🙌
टिप्पणी पोस्ट करा